• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 27, 2017

जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारविरोधात राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन – प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव नाईक

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारविरोधात राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन – प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव नाईक
नवी मुंबई : सरकार जनतेवर करीत असलेल्या अन्यायाच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हल्लाबोल आंदोलन असून जोपर्यत जुलमी सरकार पायउतार होत नाही, तोपर्यंत संघर्ष सुरुच राहिल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला आहे.
जनतेच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरलेल्या नाकर्त्या केंद्र आणि राज्य सरकारविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने देशभर हल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे. डॉ.नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने बेलापूर येथील कोकण भवन मुख्यालयावर हे जळजळीत आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबतच सर्वसामान्य नागरिक देखील मोठया संख्येने सहभागी झाले होते. बोल बोल हल्लाबोल… ची गर्जना करित सरकारविरोधी घोषणांनी कोकण भवनचा परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला होता.
डॉ.नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिष्टमंडळ कोकण विभागीय उपायुक्तांना  भेटले अणि त्यांना मागण्यांचे लेखी निवेदन दिले. राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र इथापे, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, जिल्हा युवकअध्यक्ष सुरज पाटील, जिल्हा महिलाअध्यक्षा माधुरी सुतार, जिल्हा सेवादल अध्यक्ष दिनेश पारख, जिल्हा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष जब्बार खान, पलिकेच्या स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद डॉ.जयाजी नाथ आदींनी या आंदोलनात भाग घेतला.
सरकारने केलेली नोटाबंदी आणि लादलेल्या जीएसटी टॅक्समुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे, अशी टिका  करीत डॉ.नाईक यांनी सरकारकडून नवी मुंबईचे स्थानिक प्रश्‍न सुटले नसल्याचा घणाघात केला. टोलनाके कायम आहेत, प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीच्या घरांवर कारवाई होतेच आहे, प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद केले आहे, डंम्पींग ग्राउंडला पर्यायी जागा दिलेली नाही, धार्मिक स्थळांवर कारवाई सुरु आहे, अशी अनेक उदाहरणे देत डॉ.नाईक यांनी सरकारला जागे करण्यासाठी हे हल्लाबोल आंदोलन सुरु केल्याचे सांगितले.
जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी देखील सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरल्याची खरमरीत टिका केली. सत्तेवर येण्यापूर्वी अब की बार मोदी सरकार.. असा जोरदार प्रचार करण्यात आला होता. तीन वर्षात जनतेला आपली चूक उमगली असून एक ही भुल कमल का फुल.. असे लोक म्हणून लागल्याचा टोला त्यांनी लगावला. नवी मुंबईकरांच्या समस्यांकडे देखील या सरकारने साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप सुतार यांनी केला.
माजी महापौर सोनावणे यांनी आपल्या खास शैलीत सरकारचा समाचार घेतला. तीन वर्षे जनतेने अच्छे दिनची वाट पाहिली मात्र जनता होरपळून निघाली. जनतेचा हा आक्रोश हल्लाबोल आंदोलनातून बाहेर पडला आहे असे सांगून २००९ नंतरच्या धार्मिक स्थळांवर होत असलेल्या कारवाईचा त्यांनी निषेध केला. कोर्टाचा आडोसा घेवून सरकार आपली जबाबदारी झटकू पाहत असल्याची टिका देखील त्यांनी केली.
या सरकारच्या काळात श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत गेल्याची टिका महिला जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार यांनी केली. नोटबंदीमुळे बँकातील स्वतःचाच पैसा नागरिकांना संकटकाळी देखील वापरता आला नाही याची आठवण करुन देत नवी मुबईच्या समस्या या सरकारला सोडविता आल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.
जाहिरातबाजीवर सरकार करोडो रुपये खर्च करते मात्र हाच पैसा शेतकर्‍यांना मदत म्हणून दिला असता तर त्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या, असे स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील म्हणाल्या.
हे सरकार केवळ घोषणा करणारे सरकार असून या घोषणांची पुर्तता त्यांच्याकडून झाली नसल्याचे जिल्हा उपाध्यक्ष इथापे म्हणाले.
Previous Post

विधानपरिषदेत ‘अदृश्य बाण’ चमत्कार घडवणार!: खा. अशोक चव्हाण

Next Post

बॅक ऑफ बरोडा दरोड्यातील अटकेतील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

Next Post
जुईनगर येथील बॅक ऑफ बरोडाच्या शाखेत घरफोडी

बॅक ऑफ बरोडा दरोड्यातील अटकेतील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

भाजपाचा विकास व व्हिजन हे फोटोशॉप पुरतेचः डॉ. राजू वाघमारे

काँग्रेस पक्षाच्या वतीने २९ नोव्हेंबर पासून ‘सामाजिक परिवर्तन अभियान’: डॉ. राजू वाघमारे

ठाणे-तुर्भे मार्गावरील प्रवास १५ ते २० मिनिटांवर येणार

ठाणे-तुर्भे मार्गावरील प्रवास १५ ते २० मिनिटांवर येणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com