• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 13, 2017

बुलेट पेक्षा इंजिन सुसाट

adminbyadmin
in देश - विदेश
0
बुलेट पेक्षा इंजिन सुसाट

पाच वर्षांच्या कालावधी नंतर मुंबईत प्रचंड महामोर्चा काढून प्रशासनाला वेठीस आणणाऱ्या मनसे प्रमुख , मराठी हृद्यसम्राट राज ठाकरे यांची इंजिन आता बुलेट पेक्षाही सुसाट निघाली आहे . मुंबई कुणाची हे ओरडून सांगण्याची मराठी भूमीपुत्राला आता गरज राहणार नाही . कारण 5 ऑक्टोबरला राज ठाकरेंच्या आवाहना नंतर मुंबईत निघालेला वादळी मोर्चा हा मुंबईवर डोळा ठेवून असणाऱ्या परप्रांतीय लोंढे व गुजराती भाषिकांसाठी एक ट्रेलर होता अस म्हंटल तर काही वावगं ठरणार नाही . मराठी माणूस जितका संयमी तेवढाच आक्रमक देखील आहे . मराठी माणसाच्या स्वभावाची सत्व परीक्षा अनेकांनी घेऊ पाहिली मात्र अनेकांचे प्रयत्न पालथे पडले आहेत . माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी मुंबई महाराष्ट्राला मिळवू न देण्याचा पुरेपूर घाट घातला होता . मराठी द्वेष्ट्या अनेकांनी मराठी माणसाला मुंबई पासून तोडण्याचा सातापार प्रयत्न केला मात्र विरोध करणाऱ्याच्या हाती वाळूच शिल्लक राहिली . मराठी माणूस नेहमीच संयमी असतो जेव्हा त्याचा संयम सुटतो तेव्हा सूर्याने आग ओकावी तसा मराठी माणूस अस्तित्वाची बाजी टिकवण्यासाठी आग ओकतो आणि भल्याभल्यांना या आगीत कोळसा करून टाकतो . राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत निघालेला मोर्चा हा मराठी माणसाचा केवळ संताप नव्हे तर नसानसातून भडकलेली आग आहे आणि ही आगच आता मनसेच्या इंजिनाला बुलेट पेक्षा सुसाट घेऊन जाणार आहे . अन्न , वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा . या तीन गरजा मध्येच माणसाचे खरे सुख आहे . आणि हे सुख मिळवण्यासाठीच माणसाची दैनंदिन धावपळ सुरू आहे . मराठी माणसाचा एक इतिहास आहे . मराठी माणूस कधीच या आशेने या गरजा भागवण्यासाठी धावपळ करत राहिला नाही . मराठी माणूस नेहमीच शस्त्र उचलून चालत राहिला ते केवळ देव , देश अन धर्मासाठी . दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा म्हणूनच हिमालयाच्या मदतीला महाराष्ट्राचा सह्याद्री धावला  आहे . मनसे संपली असं म्हणणाऱ्या विरोधकांना राज ठाकरे यांचा संताप मोर्चा विरोधकांच्या गालावर एक जोरदार लगावलेली चपराक आहे . दिवस मावळतो तो उगवण्यासाठी . राज ठाकरे यांची मावळलेली मनसे आता उगवते आहे . गुजराती भाषिकांची मक्तेगिरी , परप्रांतीयांची गर्दी मराठी माणसाच मुंबईतलं अस्तित्व कमी करू पाहत आहे . विकासाच्या नावाखाली मुंबईतील परिस्थिती अशीच सुरु राहली तर एक टक्का देखील मराठी माणूस मुंबईत दिसणार नाही …. आज महागाईच्या वणव्याने मराठी माणसाची पावलं स्वस्त निवाऱ्यासाठी मुंबईच्या बाहेर पडत आहे . मराठी माणसाशी भांडून मुंबई मिळवता येणार नाही तर मराठी माणसाच मानसिक खच्चीकरणं करून मुंबई जिंकण्याचा गुजरातींचा डाव दिसतो आहे . रिलायन्स मेट्रोच्या विकासकामात घाटकोपर ते वर्सोवाच्या दरम्यान वीस हजार मराठी कुटुंबे मुंबई बाहेर फेकली गेली . मेट्रो , मोनो , बुलेट हा विकास नाही तर मराठी माणसाला विकासाच्या नावाखाली मुंबई पासून तोडण्याच षडयंत्र सुरु आहे . मुंबई ही मराठी माणसाची माय आहे . राज ठाकरे यांचा मनसे हा राजकीय पक्ष जरी असला तरी मुंबईला मनसेशिवाय तारणहार नाही . स्वर्गीय हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर राज ठाकरे हेच या भूमीचे आशास्थान आहेत . मराठी माणसाने विश्वासार्हपणे राज ठाकरे यांच्या मागे उभे राहिले पाहिजे . अनेक जण केल्या नंतर करून दाखवले म्हणतात मात्र महाराष्ट्रात एकमेव नेता असा आहे की जो बोलतो ते करून दाखवतो . टोल नाका , रेल्वे भरती , मराठी पाट्या , परप्रांतीय आंदोलन , पोलिसांसाठी आझाद मैदानात मूक मोर्चा अन आता चेंगराचेंगरीत फसलेल्या सामान्य माणसासाठी रेल्वे मुख्यालयावर काढलेला प्रचंड महामोर्चा आज सत्ता नसतानाही राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या समस्यां सोडवन्यात यश मिळवले आहे . लोकसभा , विधानसभा आणि महानगर पालिकेत दारुण पराभव होऊन सुद्धा राज यांनी हार न पत्करता निमूटभर कार्यकर्त्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा सिंह गर्जना देत महाराष्ट्र पिंजून काढत नवनिर्माणाच्या दिशेकडे पाऊल टाकले आहे .कालोख्याच्या अंधारात सापडलेली मनसे आता उजेडात प्रकाशाची किरणे होऊन महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात पसरते आहे . तुमच्या राजाला साद द्या या गाण्यात आता कसला ही वाद नाही कारण महाराष्ट्रातल्या जनतेने आता राज ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी विकासरुपी साथ दिली आहे . 

—  निलेश पांडुरंग मोरे  मो – 9867477598 

Previous Post

खालचा ओवळा गावाचेही पुनर्वसन करा! लोकनेते रामशेठ ठाकूर

Next Post

माजी राष्ट्रपीत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती निमित्त विविध वाचन प्रेरक उपक्रम

Next Post
माजी राष्ट्रपीत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती निमित्त विविध वाचन प्रेरक उपक्रम

माजी राष्ट्रपीत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती निमित्त विविध वाचन प्रेरक उपक्रम

आगरी-कोळी भवनात बुधवारी रंगणार संगीतमय दिवाळी पहाट

आगरी-कोळी भवनात बुधवारी रंगणार संगीतमय दिवाळी पहाट

खासदार राजन विचारेंकडून सानपाड्यातील पादचारी पुलाची पाहणी

खासदार राजन विचारेंकडून सानपाड्यातील पादचारी पुलाची पाहणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com