• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 2, 2017

शिवसेना सोशल मिडीयावर भाजपची बदनामी करतेय – ना. रवींद्र चव्हाण

adminbyadmin
in पनवेल
0
शिवसेना सोशल मिडीयावर भाजपची बदनामी करतेय – ना. रवींद्र चव्हाण
पनवेल :  सत्तेत असणारी शिवसेनेसारखी मंडळी सोशल मीडियावर भाजपाची बदनामी करण्याचे काम करीत आहेत.शेकाप सारख्या विरोधकांचीही कामाची पद्धत चुकीची आहे.  आपले सरकार सक्षम राष्ट्रनिर्माणासाठी काम करीत असून ते चांगले कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी क्रियाशील राहणे गरजेचे  आहे असे प्रतिपादन ना. रवींद्र चव्हाण  यांनी खारघरमध्ये केले आहे.  खारघर पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये  भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी  ते बोलत होते.  
           खारघर प्रभाग ५ च्यावतीने सेक्टर १२ मधील लँडमार्क सोसायटीत भाजपच्या  जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब पाटील, जे. एन. पी. टी. चे विश्‍वस्त महेश बालदी, अश्‍विनभाई पटेल, प्रविणभाई पटेल, नगरसेवक रामजीभाई बेरा, शत्रुघ्न काकडे, निलेश बाविस्कर, नेत्रा पाटील, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, निशा सिंह, अंबालाल पटेल, दत्ता वर्तेकर, दिपक शिंदे यांच्यासह मान्यवर आणि भाजपचे कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
          यावेळी मार्गदर्शन करताना राज्यमंत्री ना. रवींद्र चव्हाण म्हणाले कि, नागरी समस्यांचे निवारण करण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाची नितांत गरज असते. सर्व नगसेवकांचे त्याबद्धल अभिनंदन. खारघर सारख्या सुशिक्षित वस्तीमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. यामागे कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारसरणीचे विकासाचे राजकारण करणारे भाजपचे कार्यकर्ते आहेत. लोकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांची आहे असेही ते म्हणाले.  केंद्रात आणि राज्यात भाजपाचीच सत्ता असल्याने विविध लोकाभिमुख योजनांचे गरजू लाभारती या विभागात वाढवण्यासाठी काम करायला हवे.सत्तेत असणारी शिवसेनेसारखी मंडळी सोशल मीडियावर भाजपाची बदनामी करण्याचे काम करीत आहेत .शेकाप सारख्या विरोधकांचीही कामाची पद्धत चुकीची आहे.  त्यामुळे आपले सरकार सक्षम राष्टनिर्माणसाठी करीत असल्याचे चांगले लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनीक्रियाशील राहणे गरजेचे आहे असेही ते यावेळी म्हणाले. 
         
चौकट 
       पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयच्या विचारसरणीला अनुसरून केंद्र आणि राज्य सरकार काम करीत आहे. म्हणूनच भाजप देशात मजबूत होत आहे.खारघरमध्ये सुद्धा भाजपचे सर्व नगरसेवक निवडून आले आहेत. आता लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपचे नगरसेवक तन मन धन अर्पण करून काम करतील असा मला विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार समाजाच्या प्रत्येक घटकासाठी काम करीत आहे याची माहिती देण्याचे आणि नागरिकांच्या समस्या निवारण्यासाठी हे कार्यालय उपयुक्त ठरेल. 
— आमदार प्रशांत ठाकूर 
Previous Post

सर्वानी जोमाने कामाला लागा : प्रगतिशील महानगरपालिका बनवा : रामशेठ ठाकूर

Next Post

स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी श्रमदान

Next Post
स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी श्रमदान

स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी श्रमदान

जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या पुर्वतयारीचा आयुक्तांनी घेतला आढावा

जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या पुर्वतयारीचा आयुक्तांनी घेतला आढावा

लवकरच होणार राजमाता जिजाऊ उद्यानाचा कायापालट

लवकरच होणार राजमाता जिजाऊ उद्यानाचा कायापालट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com