• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 30, 2017

कोल्ही कोपर गावचा शेवटचा एक गाव एक गणपती

adminbyadmin
in पनवेल
0
कोल्ही कोपर गावचा शेवटचा एक गाव एक गणपती

पनवेल :- बाबुराव खेडेकर 

              पनवेल तालुक्यातील कोल्ही कोपर गाव येथील स्वयंभू गणपतीमुळे नावारूपास आलेले आहे .या गावात घराघरात गणपती बसत नसून गावाचे ग्रामदैवत असलेल्या चिंतामणीची सेवा हाच उत्सव येथे जल्लोषात साजरा केला जातो. गावातील एकोपा व परोपकारी वृत्ती वाढीसाठी गणेशोत्सव महत्वाची भूमिका पार पाडत आहे. हे गाव नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विस्थापित होत असून कोल्ही कोपर गावचा हा शेवटचा एक गाव एक गणपती असेल असे भाविक सांगत आहेत. असे असले तरी जेथे जाऊ तेथे चिंतामणीची सेवा करू असा निर्धारही गावातील कांही बुजुर्ग नागरिकांनी व्यक्त केला आहे. 
          कोकण आणि गणेशोत्सव हे नाते अतूट आहे. घरातील गणेशमूर्ती सामाजिक एकोप्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक उत्सव बनवून पूजन सुरु केले. त्यातूनच गणेश मंडळांचे पेव फुटले.मंडळांमध्ये स्पर्धा वाढली त्यामुळे गावात गटातटात कटुता निर्माण व्हायला लागली. त्यामुळेच सुजाण नागरिकांनी एक गाव एक गणपती हि संकल्पना राबविण्याचे ठरवले. त्यानुसार एका गावातील अनेक मंडळांना गावचा एकमेव गणपती बसविण्याची जबाबदारी देण्यात येऊ लागली. 
          पनवेल तालुक्यातील कोल्ही कोपर गावाची गोष्ट कांही निराळीच आहे. या गावामध्ये स्वयंभू गणेश असल्यामुळे हजारो वर्षांची या एकमेव  गणपती पूजनाची परंपरा आजही कायम आहे. गावात घराघरात गणपती नसून गावकऱ्यांच्या मनामनात स्वयंभू गणेश विराजमान आहेत. त्यामुळे सार्वजनिकरित्या नामसंकीर्तन; आरत्या,गौरीपूजन,महाप्रसाद सर्व कार्यक्रम गावकरी या स्वयंभू गणेश मंदिरात करीत असतात. 
           कोल्ही कोपर गावात ३५० ते ४०० कुटुंबे राहतात. हे गाव नियोजित नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विस्थापित होत आहे. त्यामुळे  कोल्ही कोपर गावचा हा शेवटचा एक गाव एक गणपती असेल असे येथील भाविक सांगत आहेत. पुढीलवर्षी कोल्ही कोपर गावातच चिंतामणीची आपल्या हातून सेवा होईलच अशी खात्री नसल्यामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवाचा नूर कांही औरच आहे. 
         या उत्सवी परंपरेला  २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. येथील स्वयंभू गणेशाबाबतची माहिती  सांगताना  १९५० च्या दशकात मूर्तीबाबत नागरिकांना माहिती मिळाली तेंव्हा मूर्तीवर एक फूट सेंदूरचा थर होता. सेंदूर बाजूला केल्यानंतर मूर्ती प्रकटली त्यानंतर ग्रामस्थांनी येथे मंदिर उभारले. त्यांनतर दोनदा मंदिराचा जीर्णोद्धार केला असल्याची माहितीही ग्रामस्थांनी दिली.  

 
चौकट 

पनवेलमधील धाकटा खांदा येथेही स्वयंभू गणेशमूर्ती असल्यामुळे येथेही एक गाव एक गणपती हि परंपरा जोपासली जात आहे. गावातील एक गणपती आणि तोही विसर्जित न होणारा त्यामुळे हा इको फ्रेंडली गणेशोत्सव आहे असेही येथील तरुण सांगत आहेत.
Previous Post

मीरा-भाईंदरच्या महापौरपदी भाजपाच्या डिम्पल मेहता

Next Post

भजनसम्राट हंसारामबुवा नेरूळकर अनंतात विलीन

Next Post
भजनसम्राट हंसारामबुवा नेरूळकर अनंतात विलीन

भजनसम्राट हंसारामबुवा नेरूळकर अनंतात विलीन

अतिवृष्टी काळात एन.एम.एम.टी.ची अतिरिक्त तत्पर सेवा

अतिवृष्टी काळात एन.एम.एम.टी.ची अतिरिक्त तत्पर सेवा

आणि कैलाश पर्वतावर डमरु वाजू लागला !

आणि कैलाश पर्वतावर डमरु वाजू लागला !

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com