• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 9, 2017

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर आमचे समाधान नाही – सुनील तटकरे

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर आमचे समाधान नाही – सुनील तटकरे

मुंबई  : मुख्यमंत्र्यांच्या मराठा आरक्षणावरील निवेदनावर आमचे तरी समाधान झालेले नाही. मोर्चेकऱ्यांचे सुध्दा किती समाधान झाले याबाबतही साशंकता आहे. निवेदनाच्या प्रतीवर असमाधान व्यक्त करत पुढील काळात या मागण्यांवर ठोस कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. आरक्षण वगळता मुख्यमंत्र्यांनी आज ज्या उपाययोजना सांगितल्या त्या कालबद्ध मर्यादेत पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. 

 पुढे ते म्हणाले आजचा मोर्चा शांततामय वातावरणात निघाला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्व बांधव, भगिनींचे याबद्दल अभिनंदन. मागचे ५७ मोर्चे आणि आजच्या मोर्चातही प्रचंड जनसमुदाय होता. लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या कशा मांडायच्या याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठा क्रांती मूक मोर्चा. मुंबई, आझाद मैदानाने आजवर अनेक मोर्चे पाहिले. मात्र इतक्या मोठ्या संख्येने शांततेत निघालेला हा एकमेव मोर्चा असावा.

 आज ऑगस्ट क्रांती दिन साजरा करत असताना आपल्या आर्थिक, शैक्षणिक गरजा कशा पूर्ण कराव्यात याबाबत मराठा समाज जागरूक दिसला. शिष्टमंडळातील भगिनींनी उद्विग्न होत आपल्या भावना आज मांडल्या. हा खुप वर्षांचा उद्रेक बाहेर पडताना दिसला. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधणार असे सांगितले. पण पाच कोटी रुपयांमध्ये किती मुला-मुलींचे वसतीगृह होईल याबाबत साशंकता आहे. कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे ३ लाख मुलांचा कौशल्य विकास केला जाईल, पण याची कालमर्यादा काय? ओबीसींच्या सवलतीप्रमाणे मराठा समाजाला सवलती देणार सांगितले. पण आजपर्यंत ओबीसींना तरी सवलती मिळाल्या आहेत का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहे. राणे समितीचा अहवाल मागासवर्गीय आयोगाला दिला असता तर मराठा आरक्षण कोर्टात टिकले असते. 

 मराठा मोर्चाच्या मागण्यांपैकी प्रमुख मागणी आरक्षणाची आहे. याबाबतीत मागासवर्ग आयोग नेमण्यात आला आहे,मात्र त्याचे काम सुरळीत सुरु नाही. आज मोर्चेकरांच्या मनामध्ये जो रोष आहे तो राज्यकर्त्यांनी समजून घ्यावा, हीच आमची अपेक्षा आहे असे सुनील तटकरे म्हणाले

Previous Post

महापालिका आस्थापनेतील कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती देण्याची इंटकची मागणी

Next Post

सरकारकडून मराठा समाजाच्या तोडांला पाने पुसली. – अजित पवार

Next Post
सरकारकडून मराठा समाजाच्या तोडांला पाने पुसली. – अजित पवार

सरकारकडून मराठा समाजाच्या तोडांला पाने पुसली. – अजित पवार

लोकमान्य टिळकांच्या शाळेला आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा!

राज्यपालांनी कुलगुरूंवर केलेली कारवाई स्वागतार्ह, मात्र अधिक कठोर कारवाई हवी!: विखे पाटील

लोकमान्य टिळकांच्या शाळेला आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा!

इंदिराजी देशातील आजवरच्या सर्वात लोकप्रिय व शक्तीशाली पंतप्रधान!: विखे पाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com