• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 2, 2017

राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या मित्र पक्षांची साथ लाभेल – आ. नरेंद्र मेहता

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या मित्र पक्षांची साथ लाभेल – आ. नरेंद्र मेहता

सुजित शिंदे : 8369924646 / 8082097775

** भाजप आणि रिपाईचे जागावाटप जाहीर
** जागावाटपात रिपाईला चार जागा
ठाणे : मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजप आणि रिपाईचे जागावाटप झाले असून भाजप 91 जागांवरआपले उमेदवार उभे करणार असून, तब्बल चार जागा रिपाईला देण्यात आल्याची घोषणा आमदार नरेंद्र मेहता यांनी केली. राष्ट्रीय समाज पक्षानेही या निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याची माहिती देत, महापालिकेच्या किमान 70 जागांवर आमच्या आघाडीला विजय मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मीरा भाईंदर महापालिकेसाठी रिपाईसोबत निवडणुक लढवण्याचा निर्णय भाजपने जाहीर केला आहे. मीरारोड येथील सेव्हन स्क्वेअर आकादमीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मेहता यांनी सांगितले की, जनतेच्या इच्छेनुसार भाजपने स्वबळावर निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला असून या प्रयत्नात आम्हाला रिपाई वरासप या मित्रपक्षांशी साथ लाभली आहे. भाजपने नेहमीच सामाजिक न्यायाची भुमिका घेतली आहे. सर्वसमाज घटकांना सोबत घेत मित्र पक्षांपैकी रिपाई आणि रासपच्या स्थानिक नेत्यांशी समन्वय साधत प्रचारमोहिम राबवली जात आहे. ते पुढे म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्याच्या सत्तेतील वाटा देण्याचे वचन भाजपाच्या नेतृत्वाने या मित्रपक्षांना दिले होते. हे वचन आमच्या राज्यातील नेतृत्वाने पाळल्याने आमच्या कोणत्याही मित्रपक्षाची कुठलीच तक्रार नाही. त्यामुळेच मीरा भाईंदर महापालिकेतही या सर्व मित्र पक्षांकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
उमेदवार निवड प्रक्रियेबाबत विचारले असता, ते म्हणाले की, ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमुळे भाजपउमेदवारांची यादी जाहीर होण्यास विलंब झाला आहे. उमेदवार निवडीसाठी एक सर्व्हे करण्यात आला असून,त्या सर्व्हेनुसारच सर्व ठिकाणी सक्षम आणि योग्य उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणालाही अगोदर आश्‍वासन देवून मग तिकीट नाकारले, अशी एकही तक्रार येणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. तिकीट वाटपात सर्व जातीधर्म आणि समाज घटकांना प्राधान्य देण्यात आले आहे. कुणा बड्या नेत्याच्या शिफारसीवरून किंवा एखाद्याच्या नातेवाईकाच्या शिफारसीमुळे तिकीट मिळणार नसल्याची बाब आमच्या नेतृत्वाने अगोदरच स्पष्ट केल्याने उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतरही नाराजीचा फटका बसणार नसल्याचेही ते म्हणाले.

Previous Post

‘इकोफ्रेंडली’ उत्सवास प्राधान्य देणारी ‘नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धा -2017’

Next Post

नवीन येणार्‍या ‘झाशीची राणी’ चित्रपटात नवी मुंबईतील मुले चमकणार

Next Post
नवीन येणार्‍या ‘झाशीची राणी’ चित्रपटात नवी मुंबईतील मुले चमकणार

नवीन येणार्‍या ‘झाशीची राणी’ चित्रपटात नवी मुंबईतील मुले चमकणार

एपीएमसीतील भाजी मार्केटमधून प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

एपीएमसीतील भाजी मार्केटमधून प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

धोकादायक इमारतींचा वापर थांबविणेबाबत जाहीर आवाहन

धोकादायक इमारतींचा वापर थांबविणेबाबत जाहीर आवाहन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com