• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 26, 2017

घाटकोपरमध्ये 17 बळी जात असताना ‘पहारेकरी’ झोपले होते का? विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा हल्लाबोल

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
थकीत ठिबक सिंचन अनुदान केंव्हा देणार ? –  राधाकृष्ण विखे पाटील

स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775

मुंबई महापालिका झाली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी

मुंबई : मुंबई महानगर पालिका प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली असून, बेकायदेशीर बांधकामामुळे घाटकोपरमधील साईदर्शन इमारत कोसळून 17 बळी जात असताना ‘पहारेकरी’ झोपले होते का, अशी संतप्त विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

घाटकोपर परिसरातील इमारत दुर्घटना प्रकरणी विधानसभेत मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर ते बोलत होते. बुधवारी सकाळी विखे पाटील यांनी या गंभीर प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधून स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. दुपारी या प्रस्तावावर बोलताना त्यांनी मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराचा कठोर शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले की, मुंबई महापालिकेत बेकायदेशीर कामांना संरक्षण देणारी आणि त्यातून मलिदा लाटणारी एक यंत्रणा राज्यकर्ते आणि प्रशासनाच्या संगनमतातून तयार झाली आहे. त्याची किंमत सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव देऊन चुकवावी लागत आहे.

नवीन इमारतीचे बांधकाम मान्यता मिळालेल्या आराखड्यानुसार होते आहे की नाही, जुन्या इमारतींमध्ये बेकायदेशीर पद्धतीने बांधकाम सुरू आहे का, हे पाहण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे घाटकोपर इमारत दुर्घटना प्रकरणी महापालिकेचे अधिकारी देखील जबाबदार आहेत. सदरहू इमारतीत बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या सुनिल शितप प्रमाणेच अधिकाऱ्यांविरूद्धही सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, घाटकोपरच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीतील रहिवाशांवर धाकदपटशा करून सुनिल शितपने बेकायदेशीर बांधकाम सुरू केले होते. त्याच्यावर कोणाचा वरदहस्त होता, हे समोर आले पाहिजे. मुंबईच्या गल्लोगल्लीत असे सुनिल शितप निर्माण झाले असून, त्यांना पोसण्याचे काम महापालिकेत सुरू आहे. घाटकोपरच्या घटनेत जीव गमावणाऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर शितपच्या मुजोरीला बळ देणारे खरे हात समोर आले पाहिजे. मुंबईकरांच्या हितासाठी महापालिकेची ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ ‘पब्लिक लिमिटेड कंपनी’झाली पाहिजे, असेही राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले.

Previous Post

एलबीटी भरावाच लागेल :- डॉ सुधाकर शिंदे

Next Post

पुढच्या महिन्यात 200ची नोट बाजारात येतेय

Next Post
पुढच्या महिन्यात 200ची नोट बाजारात येतेय

पुढच्या महिन्यात 200ची नोट बाजारात येतेय

ऐरोलीतील अनधिकृत बांधकामांवर सिडकोचा हातोडा

ऐरोलीतील अनधिकृत बांधकामांवर सिडकोचा हातोडा

मीरा- भाईंदर महानगरपालिकेसाठी 20 ऑगस्टला मतदान  -राज्य निवडणूक आयुक्त

भाजपामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार चुरस

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com