• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 4, 2017

महापौरपदाची निवडणूक ठरणार सर्वांसाठीच डोकेदुखी

adminbyadmin
in संपादकीय
0
स्थानिक संस्था कराच्या वसूलीने पार केला 1000 कोटींचा विक्रमी टप्पा

नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक ऑक्टोबर 2017 मध्ये होत आहे. महापौर निवडणूकीकरता अद्यापि पाच महिन्याचा कालावधी शिल्लक असला तरी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या रथीमहारथी इच्छूकांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरूवात केलेली आहे. इतर मागासवर्गीय (ओबीसी) करता आगामी महापौरपद राखीव असून सर्वच पक्षात मातब्बर ओबीसी उपलब्ध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे काठावरचे बहूमत असल्याने शिवसेना-भाजपा आणि काँग्रेस अशी महाआघाडी करून राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करण्याचे मनोरथ अनेक राजकीय घटक रचत असले तरी महापौरपदाचा उमेदवार निश्‍चित होताच महाआघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतील 2000 सालचा आणि 16 नोव्हेंबर 2002 च्या महापौर निवडणूकीचा अनुभव लक्षात घेता काँग्रेसमध्ये कोणालाही उपमहापौरपदाचे गाजर दाखविताच काँग्रेसचा एक गट राष्ट्रवादीला मतदान करण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महापौर पदासाठी एकाहून एक मातब्बर महापौरपदाची महत्वाकांक्षा बाळगून असल्याने कोणाला निवडायचे आणि कोणाला डावलायचे हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वापुढे डोकेदुखीचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. पोटनिवडणूकीच्या माध्यमातून सागर नाईकांचे महापालिकेत आगमन होणार असल्याच्या चर्चा राजकारणात सुरू असल्या तरी यामुळे बोनकोडेकरांचीच प्रतिमा मलीन होणार असल्याने व राष्ट्रवादीतील मातब्बर घटक नाराज होण्याची शक्यता असल्याने बोनकोडेकर हा धोका सध्या तरी पत्करणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा निवडणूकीचा खर्च वाचविण्याकरिता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका एकत्रित घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे लोकसभेसोबतच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका नियोजित वेळेपेक्षा सहा महिने अगोदर होणार असल्याचे एव्हाना निश्‍चित झाले आहे. जे महापौरपदाचे चित्र राष्ट्रवादीत आहे, तेच विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेतही आहे. विजय चौगुले, एम.के.मढवी, नामदेव भगत अशी एकाहून एक डझनावारी नावे शिवसेनेत महापौरपदाच्या उमेदवारीकरता उपलब्ध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृहातील संख्याबळ पाहता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणे अशक्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजही नवी मुंबईचे शिल्पकार असणार्‍या लोकनेते गणेश नाईकांचाच शब्द अंतिम प्रमाण मानला जात आहे. त्यातच पालिका निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक घटक शिवसेना-भाजपामध्ये जावून नगरसेवक झाले असले तरी त्यांच्यामध्ये गणेश नाईक या नावाचा गोडवा आजही कायम असल्याचे अनेकदा खासगीमध्ये पहावयास मिळालेले आहे. त्यातच स्थायी समिती सदस्य निवडीवरून शिवसेनेतील वादाचा कलगीतुरा सर्वांनाच जवळून पहावयास मिळाला आहे. 38 सदस्यांचे संख्याबळ असणार्‍या शिवसेनेत चौगुले गट आणि नाहटा गट यांचा मनोमिलाफ होणे अवघड आहे. त्यातच शिवसेनेकडून आगामी विधानसभा लढविण्याची नामदेव भगतांना महत्वाकांक्षा असल्यास त्यांना नाहटा गट व चौगुले गटापासून समांतर राहत आपले प्रभाव क्षेत्र वाढवावे लागणार आहे. नेरूळमधील शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात कोण पडद्या आडून आग लावायचे धंदे करत आहे, हे जगजाहिर असल्याने हे धंदे करणार्‍यांना विधानसभेची कदाचित तिकीट मिळाल्यास त्याची किमंत मोजावी लागणार आहे. कारण जे पेरते तेच उगवून आल्याशिवाय राहत नाही. शिवसेनेतील अनेक नगरसेवक चौगुले गट व नाहटा गटात सामील न होता आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकनेते गणेश नाईकांचाच शब्द अंतिम प्रमाण असल्याने महापौर निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दगाफटका होण्याची शक्यता नाही. शिवसेनेत स्थायी समिती सदस्य निवडीतील नाराजीचा आकडा 20 वर गेला असून महापौर निवडणूकीत कोणा प्रस्थापितांनीच पुन्हा उमेदवारीवर दावा केल्यास पुन्हा एकवार शिवसेनेच्या छावणीत अष्टविनायक प्रयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु यावेळी मात्र हा आकडा अष्टविनायकावरच सिमीत राहता 18 ते 22 च्या घरात जाण्याची भीती खुद्द शिवसैनिकांकडूनच व्यक्त करण्यात येत आहे. स्थायी समितीवर जावूनही यांचे समाधान होणार नाही, महापौर निवडणूकीलाही उमेदवारी मागणार, महापौर निवडणूकीत पडल्यावर पुन्हा विधानसभेची उमेदवारी मागणार, शिवसेना संघटना काय यांच्या नावावर करून दिली काय, अशा संतप्त प्रतिक्रिया आताच शिवसेनेच्या नगरसेवकांकडून खासगीमध्ये व्यक्त करण्यात येवू लागल्या आहेत. त्यामुळे पालिका सभागृहातील शिवसेनेत ज्वालामुखी खदखदत असून कोणतेही क्षणिक कारण फुटीला कारणीभूत ठरू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आलेले काही मातब्बर बाहूबलींना गणेश नाईकांचा आजही लळा असल्याने गणेश नाईकांनी निर्णायक क्षणी भावनिक साद घातल्यास त्यांना दादांच्या पे्रमाचा पान्हा पुन्हा फूटू शकतो अशी भीतीही शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आघाडीचा धर्म निभावताना उपमहापौरपद पदरी पडत असल्याने काँग्रेसकडून दगाफटका होणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून सांगण्यात येत आहे. उपमहापौरपदाकरिता काँग्रेसच्या छावणीत गोठीवली व वाशी गाव उत्सूक असल्याचे आता लपून राहीलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे काठावरचे बहूमत आहे. वाशी गावाला उपमहापौर दिल्यास घरातील तीन नगरसेवक आणि त्या जोडीला वाशी व ऐरोलीतील एक नगरसेवक जमाबेरीज करता पाच नगरसेवकांची तरतूद राष्ट्रवादी काँग्रेसला करून देण्याइतपत वाशी गावातील काँग्रेसी नाना सक्षम आहेत. 16 नोव्हेंबर 2002च्या घडामोडीचा लाभ यापूर्वी गोठीवली गावाला मिळाला असल्याने बोनकोडेकर शेवटच्या क्षणी काहीही करू शकतात, याचा अनुभवही तत्कालीन परिस्थितीत गोठीवलीकरांना जवळून अनुभवयास मिळालेला आहे. भाजपाचे सहा नगरसेवक महापौर निवडणूकीत शिवसेनेला पाठिंबा देतात का तटस्थ राहतात, हे तत्कालीन परिस्थितीमधील समीकरणांवर अवलंबून राहणार आहे. शिवसेना-भाजपातील वाढत चाललेले विळ्या-भोपळ्याचे सख्य पाहता भाजपा नगरसेवक तटस्थ राहण्याचीही शक्यता आहे. त्यातच गणेश नाईकांच्या भाजपा प्रवेशाच्या वावड्या दिवसेंगणिक वाढत चालल्यामुळे कदाचित पक्षाचा आदेश आल्यास भाजपा तटस्थ राहण्याचा अथवा महापौर निवडणूक लढविण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. महापौर निवडणूकीला अद्यापि पाच महिन्याचा कालावधी असला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून बसणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच महापौरपदाचा कालावधी संपताच सुधाकर सोनवणेंच्या भूमिकेकडे व हालचालींकडेही सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. भाजपा व रिपाइंची सध्याची सलगी पाहता ऐरोली मतदारसंघातून सुधाकर सोनवणे भाजपाचे उमेदवार असण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. तथापि शिक्षण मंडळ सभापती व महापौरपद दिल्यावरही सुधाकर सोनवणे हे बोनकोडेच्या विश्‍वासाला तडा देणार नसल्याचा आशावाद नाईक समर्थक नगरसेवकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

स्थानिक संस्था कराच्या वसूलीने पार केला 1000 कोटींचा विक्रमी टप्पा

Next Post

कोपरखैरणे तुर्भे व वाशी विभागात महापालिकेची फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Next Post
कोपरखैरणे तुर्भे व वाशी विभागात महापालिकेची फेरीवाल्यांवर धडक कारवाई

कोपरखैरणे तुर्भे व वाशी विभागात महापालिकेची फेरीवाल्यांवर धडक कारवाई

देवसेवेत रमले मन माझे, देवा तुझ्या पालखीचा मी भोई, तुझ्या नामस्मरणाशिवाय आणखी मी काही मागत नाही

देवसेवेत रमले मन माझे, देवा तुझ्या पालखीचा मी भोई, तुझ्या नामस्मरणाशिवाय आणखी मी काही मागत नाही

मुंबई महापालिका मनसे स्वबळावर लढविणार – राज ठाकरे

राज ठाकरेंना ‘आत्मपरिक्षणा’ची गरज

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com