• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 3, 2017

नवी मुंबई आणि परिसरासाठी स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुुरु करावे

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई आणि परिसरासाठी स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुुरु करावे
माजी खासदार डॉ.संजीव गणेश नाईक यांची मागणी
नवी मुंबई : झपाटयाने विकसीत होणारे २१व्या शतकातील नवी मुंबई महानगराची लोकसंख्या १५ लाखांच्यावर गेली आहे. नवी मुंबई लगत पनवेल, खारघर आणि उरणची लोकसंख्या १० लाखांच्या आसपास आहे. हा सर्व भाग मिळून २५ लाखांच्या लोकसंख्येच्या सोयीसाठी नवी मुंबईत स्वतंत्र पासपोर्ट कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी खासदार डॉ. संजीव गणेश नाईक यांनी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे लेखी पत्र पाठवून ३१ मार्च २०१७ रोजी केली आहे.
सध्याचे पासपोर्ट कार्यालय ठाणे शहरातील वागळे इस्टेट या भागात आहे. नवी मुंबई, पनवेल, खारघर, उरण इत्यादी परिसरातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी किंवा पासपोर्ट विषयक इतर कामे करण्यासाठी कमितकमी १५ आणि जास्तीत जास्त ५० किलोमिटरचा प्रवास करुन ठाणे शहरात  जावे लागते. त्यामध्ये त्यांचा वेळ आणि पैसाही वाया जातो.  नवी मुंबईत मोठी औद्योगिक वसाहत आहेच. मोठ-मोठी आय.टी. पार्क आहेत. हॉटेल व्यवसाय वाढला आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाची  क्रीडा संकुले आहेत.  शैक्षणिक केंद्र म्हणून नवी मुंबईचा लौकीक आहे. विद्यापिठे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्था, विविध विषयातील महाविद्यालये येथे आहेत. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरु झाले आहे. जेएनपीटी येथे चौथ्या पोर्टचे निर्माण होेते आहे. मोनो, मेट्रो रेल्वेचे काम सुरु आहे.  अनेक उद्योगपती, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्व स्तरातील नागरिकांना पासपोर्टची गरज लागते.  अशावेळेस त्यांना ठाणे येथे जावे लागते. ठाण्यातील पासपोर्ट कार्यालयात अपुर्‍या कर्मचारी वर्गामुळे  कामाचा ताण भरपूर असतो. परिणामी पासपोर्ट मिळण्यास उशिर होतो. नवी मुंबईत जर स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरु झाले तर नवी मुंबई, पनवेल, खारघर आणि उरण परिसरातील नागरिकांचा वेळ आणि पैसाही  वाचेल तसेच  त्यांना जलदगतीने पासपोर्ट देणे शक्य होणार आहे, असे डॉ.नाईक यांनी आपल्या मागणीपत्रात म्हंटले आहे. नवी मुंबईला स्वतंत्र जिल्हयाचा दर्जा देण्याचे राज्य शासनाच्या विचाराधीन असल्याने त्यादृष्टीने स्वतंत्र पासपोर्ट कार्यालयाची सुविधा गरजेची आहे.
नवी मुंबईत स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरु करावे, या मागणीचे निवेदन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबतच विभागीय पासपोर्ट अधिकारी स्वाती कुलकर्णी यांना देखील देण्यात आले आहे. 
Previous Post

दै. DNA च्या पत्रकारावरील हल्ल्याचा निषेध. दोषींवर कडक शासन करण्याची मनसेची पोलीस आयुक्तांकडे मागणी

Next Post

आठही विभागात अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Next Post
आठही विभागात अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

आठही विभागात अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

मच्छिविक्रेत्या महिलांसाठी आमदार मंदाताई म्हात्रेंचे महापौर सुधाकर सोनवणेंना साकडे

गणेश नाईक भाजपात आले तर आरती ओवाळून त्यांचे स्वागत करणार

६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

मुंढेंचा दणका; आगार व्यवस्थापकाला नोटीस

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com