• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 12, 2017

मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढावा- गजानन काळे

adminbyadmin
in नवी मुंबई
0
मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढावा- गजानन काळे

प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला मनसेचा जाहीर पाठींबा
साईनाथ भोईर / नवी मुंबई
नवी मुंबईतील गावठाण विस्तारित गावठाणातील घरांचा आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून दि.१४ मार्च २०१७ रोजी होणार्‍या बेमुदत आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठींबा दिला असून राजकीय जोडे बाजूला ठेऊन या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे पत्र आगरी-कोळी युथ फाऊंडेशनचे निलेश पाटील यांना दिल्याचे गजानन काळे यांनी म्हटले आहे.
या बेमुदत उपोषणाच्या माध्यमातून आगरी-कोळी युथ फाऊंंडेशनने केलेल्या सगळ्या मागण्या रास्त असून, राज्य शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता या मागण्या मान्य कराव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांना देखील पत्र पाठविणार असल्याचे मनसेचे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांच्या त्यागावर हे नवी मुंबई शहर उभे आहे. मात्र गेली २०/३० वर्षे उलटूनही आपल्या मागण्यांसाठी येथील प्रकल्पग्रस्तांना लढा द्यावा लागतो ही खेदाची बाब आहे. याअगोदर कॉंग्रेस-राष्ट्रवादीने व आता भाजपा-सेनेने मतांसाठी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न भिजत ठेवले असून, स्वयंघोषित प्रकल्पग्रस्त नेत्यांच्या कचखाऊपणामुळे आजही हे प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी केला आहे. मुळातच सिडको व मनपाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर राज्य सरकारकडे फक्त दिखाऊपणाचा पाठपुरावा करणार्‍या या नेत्यांना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाशी काहीही देणे घेणे नाही असेही मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. महिन्याभरात शासन निर्णय आणण्याची दर्पोक्ती करणार्‍या व सत्कार सोहळे करणार्‍या येथील स्वयंघोषित नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाचे राजकारण थांबवावे असे मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी म्हटले आहे.
या बेमुदत उपोषणाची भाषा राज्य सरकारला न कळाल्यास प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढावा. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते लाठ्या काठ्या खाण्यासाठी सगळ्यात अग्रेसर असतील असेही नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Previous Post

मंदा म्हात्रे यांनी अज्ञान प्रगट करु नये

Next Post

घणसोलीत मराठा चषक- २०१७

Next Post
घणसोलीत मराठा चषक- २०१७

घणसोलीत मराठा चषक- २०१७

निर्णायक लढ्याला यश मिळो!

निर्णायक लढ्याला यश मिळो!

न्यायासाठी आता मरणाचीही तयारी

न्यायासाठी आता मरणाचीही तयारी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com