• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 26, 2017

बैलगाडा शर्यतीसाठी अध्यादेश काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
बैलगाडा शर्यतीसाठी अध्यादेश काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : तामिळनाडूतील जलीकट्टूचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता राज्यात बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तामिळनाडू जलीकट्टूसाठी राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतर आता राज्य सरकारदेखील बैलगाडा शर्यतीसाठी अध्यादेश काढू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलचे आश्वासन दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैलगाडा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यामध्ये जलीकट्टूप्रमाणेच बैलगाडा शर्यतीसाठी अध्यादेश काढण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. बैलगाडा संघटनांच्या प्रतिनिधींच्या मागणीसाठी मुख्यमंत्री असल्याचे दिसून आले. ‘बैलगाडा शर्यत सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असून सध्या आचारसंहिता असल्याने निर्णय घेता येत नाही. मात्र आचारसंहिता संपल्यानंतर याप्रकरणी अध्यादेश काढू,’ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी बैलगाडा संघटनांच्या प्रतिनिधींना दिले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली.
बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडूनदेखील करण्यात आली होती. या संदर्भात शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली होती.
बैलगाडा शर्यतीदरम्यान बैलांनाअ अतिशय निर्दयीपणे वागवण्यात येत असल्याने २०११ मध्ये अध्यादेश काढून प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी घातली गेली होती. त्यामुळे बैलगाडा शर्यतींवरही बंदी आली. हा वाद पुढे न्यायालयात गेल्यावर निकाल बैलगाडा मालकांच्या विरोधात लागला. उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला.
मध्यंतरीच्या काळात केंद्रात सत्ताबदल झाल्यावर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी मागे घेतली होती. राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी मागे घ्यावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रकाश जावडेकरांकडे केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी कायम ठेवली होती.

Previous Post

महापालिकेच्या आरोग्य सेवेलाच उपचाराची गरज

Next Post

शिवसेना महाराष्ट्रात एकट्याने लढणार; अखेर सेना-भाजप युतीचा काडीमोड

Next Post
राज्यात सध्या सरकारचे गंमत-जंमत, शिवसेनेचे भाजपवर पुन्हा टीकास्त्र

शिवसेना महाराष्ट्रात एकट्याने लढणार; अखेर सेना-भाजप युतीचा काडीमोड

मुंढेंना आयुक्तपदी कायम ठेवल्याने मनसेकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

शिवसेनेच्या आर या पारच्या लढाईचे आव्हान भाजपाने स्विकारले

न्यायालयाने दिली महापालिकेच्या शिक्षक भरतीला स्थगिती

न्यायालयाने दिली महापालिकेच्या शिक्षक भरतीला स्थगिती

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com