• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 18, 2016

सायन-पनवेल महामार्गावरील अपघातप्रकरणी मंत्र्यांवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सायन-पनवेल महामार्गावरील अपघातप्रकरणी मंत्र्यांवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी

नवी मुंबई: सुमारे १२०० कोटी खर्चून बांधण्यात आलेला सायन-पनवेल महामार्ग सध्या सर्वसामान्य करदात्यांसाठी मृत्युचा सापळा बनत चालला आहे. गत १६ ऑगस्ट २०१६ रोजी संध्याकाळच्या सुमारास सायन-पनवेल महामार्गावर शिरवणे पुलावर खड्ड्यांमुळे दुचाकीकरील कमलाकर मोकल (५१) आणि संगिता उबाळे (४७) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे सदर प्राणांतिक अपघाताला सार्वजनिक बांधकाम मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी-कार्यकारी अभियंता यांच्यासह संबंधीत उपअभियंता आणि कंत्राटदार यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’तर्फे मुख्यमंत्री आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
सध्या सायन-पनवेल महामार्गावर खड्ड्यांमुळे १६ ऑगस्ट रोजी दुचाकी धीम्या गतीने जात असताना मागून आलेल्या डंपरची दुचाकीला धडक बसून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. सदरचे प्रकरण गंभीर असून पीडब्ल्युडीचे अधिकारीअभियंते, संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री यांच्या असंवेदनशिलतेमुळे सदरचा अपघात घडल्याचे ‘मनसे’तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
सायन-पनवेल महामार्गावरील खड्डे नैसर्गिक कारणांमुळे न पडता पीडब्ल्युडी विभाग आणि संबंधित कंत्राटदार यांनी महामार्गाच्या देखभालीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे पडले आहेत. इतके अपघात घडून सुध्दा पीडब्ल्युडीच्या अधिकारीअभियंत्यांनी झोपेचे सोंग घेतल्याप्रमाणे सदर अपघातांकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप ‘मनसे’चे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे.
करोडो रुपयांची कंत्राटे देऊन सुध्दा रस्त्यांची अशी दयनीय अवस्था होते, त्यावर पीडब्ल्युडी विभाग आणि संबंधित कंत्राटदार काहीच ठोस कार्यवाही करीत नसल्याबद्दल गजानन काळे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात तर घडतच आहेत; पण त्याचबरोबर या महामार्गावरील प्रवासादरम्यान लोकांचा वेळ देखील वाया जात आहे. वास्तविक पाहता महामार्गाची दुर्दशा होताच क्षणी सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित रस्ते कंत्राटदाराकडून तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करुन घेणे अपेक्षित होते. पण, तसेच संबंधितांकडून झालेले नाही. त्यामुळे सायन-पनवेल महामार्गावर पडलेले खड्डे आणि या खड्ड्यांमुळे झालेल्या प्राणांतिक अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभाग, या खात्याचे मंत्री आणि संबंधित कंत्राटदार यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ‘मनसे’तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे करण्यात आली आहे.

Previous Post

अनाथ मुलांसोबत आयुक्त मुंढेंचा स्वातंत्र्यदिन उत्साहात

Next Post

मृत वृक्षांचे सेल्फी पॉर्इंट्स ठरतील धोकादायक

Next Post
मृत वृक्षांचे सेल्फी पॉर्इंट्स ठरतील धोकादायक

मृत वृक्षांचे सेल्फी पॉर्इंट्स ठरतील धोकादायक

ठाणे विधानपरिषद निवडणूक, वसंत डावखरे विरुद्ध रविंद्र फाटक

जीएसटी विधेयक मंजुरीसाठी राज्याचं विशेष अधिवेशन

17 ऑगस्टला ठरणार दहीहंडीची उंची

स्टुलावरून हंडी फोडायची का? :राज ठाकरे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com