• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 20, 2016

धोकादायक इमारतींचा पाणी व वीजपुरवठा खंडीत होणार

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
धोकादायक इमारतींचा पाणी व वीजपुरवठा खंडीत होणार

मुंबईत ७४० धोकादायक इमारती

मुंबई : पावसाळा आता उंबरठ्यावर आलेला असतानाच पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळण्याच्या घटना लक्षात घेवून धोकादायक इमारतींचा पाणी व वीजपुरवठा खंडीत करण्याचा मुंबई महापालिकेने निर्णय घेतला आहे. पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक इमारतींमधील रहीवाशांना जबरदस्तीने सदनिका खाली करण्यास भाग पाडण्याकरताच मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

पावसाळीपूर्व कामांचा आढावा घेताना महापालिका प्रशासनाकडून मुंबईतील धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यात आला.  या सर्व्हेमध्ये मुंबई शहर व उपनगरातील ७४० इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या. यातील अधिकांश इमारती पावसाळ्यामध्ये कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. महापालिकेने धोकादायक घोषित केलेल्या इमारतींमध्ये शासकीय, महापालिकेच्या तसेच खासगी इमारतींचाही समावेश आहे.

दक्षिण मुंबईतील डाकयार्ड रोडवरील बाबु गेनू मार्केटची इमारत दोन वर्षापूर्वी कोसळली. या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली ७२ लोकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई मनपाने प्रथमच आक्रमक होत सावध पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. मनपाने घोषित केलेल्या ७४० धोकादायक इमारतींमध्ये ३०८ इमारती या पश्चिम उपनगरातील आहेत आणि २८६ इमारती पूर्व उपनगरातील आहेत. मुंबई शहरातील धोकादायक इमारतींपैकी १४६ इमारती कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती मनपाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मनपा प्रशासनाने गेल्या वर्षी ५४२ इमारती धोकादायक घोषित केल्या होत्या. त्यातील अधिकांश इमारती पाडण्यात आल्या आहेत. यावर्षी घोषित केलेल्या धोकादायक इमारती लवकरच पालिका प्रशासनाकडून पाडण्यात येणार आहेत. मनपा प्रशासनाने सी-१ व सी-२ श्रेणीतील धोकादायक इमारती तात्काळ खाली करण्याच्या नोटीसा रहीवाशांना दिल्या आहेत. इमारत खाली न केल्यास व दुर्घटना झाल्यास त्या दुर्घटनेतील जिवित व वित्त हानीस महापालिका प्रशासन जबाबदार राहणार नसल्याचा इशारा महापालिकेने नोटीशीमध्ये दिला आहे.

Previous Post

नवी मुंबईत हिंदू दफनभूमीचा प्रश्‍न जटील

Next Post

मुंबईत सात डान्सबारवर पोलिसांचे छापे, 90 बारबालांची सुटका

Next Post
बारमालकांचे ७ जुनच्या सुनावणीकडे लक्ष,  २६ अटींवर होणार सुनावणी

मुंबईत सात डान्सबारवर पोलिसांचे छापे, 90 बारबालांची सुटका

दुष्काळग्रस्तांना करावा लागतोय मुंबईतही संघर्ष

दुष्काळग्रस्तांना करावा लागतोय मुंबईतही संघर्ष

एकनाथ खडसेंवर राजीनाम्यासाठी दबाव?

दाऊद प्रकरणी खडसेंना क्लीन चिट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com