• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 30, 2015

मिरा-भाईंदरकरांनी टाकलेला विश्‍वास सार्थ ठरविल्याचा आनंद : संजीव नाईक

adminbyadmin
in ठाणे
0
मिरा-भाईंदरकरांनी टाकलेला विश्‍वास सार्थ ठरविल्याचा आनंद : संजीव नाईक

खासदारनिधीतून झालेल्या नागरी कामांचे लोकार्पण
भाईंदर : प्रतिनिधी
खासदारकीच्या पाच वर्षाच्या कालखंडात लोकाभिमुख आणि मिरा-भाईंदर, ठाणे तसेच नवी मुंबई शहरांसाठी भूषणावह ठरतील, अशा विकास योजना व प्रकल्प साकारले आहेत. मिरा-भाईंदरकरांनी दिलेली संधी आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझयावर टाकलेला विश्‍वास आज सार्थ ठरत असल्याबद्ल मला अत्यंत आनंद होत असल्याच्या भावना ठाणे लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार संजीव नाईक यांनी व्यक्त केल्या आहेत.
नाईक यांनी खासदारकीच्या यशस्वी कालखंडात ठाणे लोकसभा मतदारसंघात अनेक विकास योजनांची पुर्तता केली आहे. खासदारनिधीतून भाईंदर पश्‍चिमेकडील नगरसेविका दक्षता पाटील यांच्या प्रभागात प्रभाग क्रं ४७ मध्ये अद्ययावत स्वच्छतागृह आणि समाजमंदीर बांधण्यात आले आहे. तर नगरसेविका अनिता परमार आणि प्रणाली पाटील यांच्या प्रभाग क्रमांक २७ मध्ये समाजमंदीर बांधण्यात आले आहे.
मिरा-भाईंदर पालिकेच्या हददीतील घोडबंदर खाडीकिनारी श्री गणेशघाटातील पुर्नबांधणी करुन प्रशस्त रस्ता निर्माण करण्यात आला आहे. या तीन्ही कामांचे लोकार्पण डॉ. नाईक यांच्या हस्ते रविवारी झाले. त्याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सर्वसामान्य जनता त्यांच्या समस्या आपल्याकडे घेऊन येण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा त्या समस्या सोडविण्यासाठी जनतेच्या दारात स्वतःहून पोहचा असा सल्ला नाईक यांनी कार्यक्रमास उपस्थित लोकप्रतिनिधींना यांना दिला. आपण नागरिकांना दिलेल्या वचनाची पूर्तता होत असल्याचे सांगत सर्व धर्म समभावनेची शिकवण देणार्‍या मीरा-भाईंदर येथील नागरिकांना हे समाज मंदिर खर्‍या अर्थाने चांगल्या विचारांचे व्यासपीठ निर्माण करुन देणारे ठरेल, असा आशावादही व्यक्त केला.
या उद्घाटन कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे मिरा-भाईंदरचे जिल्हाअध्यक्ष मोहन पाटील, नगरसेवक धु्रवकिशोर पाटील, नगरसेविका अनिता परमार, नगरसेविका दक्षता पाटील, नगरसेविका शिल्पा भावसार, नगरसेविका प्रणाली पाटील त्याच बरोबर प्रमुख उपस्थितीत जेष्ठ समाजसेवक शांताराम ठाकूर, केशव घरत, योगेंद्र जोशी आदी मान्यवर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी, नागरिक आदी मोठया संख्येने उपस्थित होते.
खासदारकीच्या कालखंडात नाईक यांनी सर्व सामान्यांसाठी केलेल्या विविध विकासकामांची माहिती जिल्हाअध्यक्ष मोहन पाटील यांनी दिली. आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

Previous Post

अवाजवी येत असलेल्या विद्युत देयकांची चौकशी करून सुधारीत विद्युत देयक पाठविण्याची काँग्रेसची मागणी

Next Post

मेट्रो भाडेवाढ तूर्तास टळली

Next Post
मेट्रो भाडेवाढ तूर्तास टळली

मेट्रो भाडेवाढ तूर्तास टळली

नवी मुंबईत पहिल्यांदाच टपाल तिकिटांचा महोत्सव

नवी मुंबईत पहिल्यांदाच टपाल तिकिटांचा महोत्सव

प्रभाग ८७ ला भेट देण्यास मनपा आयुक्तांना वेळच नाही!

महापालिकेच्या कार्यक्रमातील निमत्रंणपत्रिकेवर पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख आवर्जून करण्याची शिवसेनेची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com