• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 3, 2015

खेळीमेळीच्या वातावरणात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली!

adminbyadmin
in महाराष्ट्र
0

मुंबई : शिवसेनेने महानगरपालिका निवडणुकीत उपसलेली बंडांची तलवार अपेक्षेप्रमाणे म्यान केली आहे. निवडणुकीतील वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी डाळीच्या महागाईचा मुद्दा तर उपस्थित केला, त्यापलिकडे मात्र ही मंत्रीमंडळ बैठक खेळीमेळीच्या वाचावरणात पार पडली. दुसरीकडे रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर आपली भांडणे संपल्याचे जाहीर केले आहे.
कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना भाजपाने एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिले. सरकारमध्ये असूनही कुणी सरकारला रस्त्यावर आणण्याची भाषा केली, तर कुणी वाघाच्या जबड्यात हात घालून दात बाहेर काढण्याची भाषा केली. या सगळ्यामुळे शिवसेना-भाजपा सरकारचे काय होणार याबाबत उत्सुकता होती. त्यातच राज्यमंत्रीमंडळाची पहिल्या बैठकीत काय होणार, शिवसेनेचे मंत्री काय भूमिका घेणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. मंत्रीमंडळ बैठकीत डाळींच्या महागाईचा मुद्दा उपस्थित करून एक आठवड्यात डाळी स्वस्त करण्याचे आश्वासन शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडून घेतले.
एकीकडे डाळीचा मुद्दा वगळता राज्य मंत्रीमंडळाची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. तर दुसरीकडे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर निवडणुकीत पुकारलेल्या जाहीर युद्धाबाबत युद्धबंदीच जाहीर केली.
शिवसेना-भाजपाचा सरकारमधील घरोबा वर्षभराचा आहे. अनेक मुद्यावरून दोन्ही पक्षात मतभेद निर्माण झाले. महानगरपालिका निवडणुकीतील टीकेने या मतभेदांवर कळस चढवला होता. मात्र मतभेद आणि भांडणांपेक्षा सत्ता महत्त्वाची याची जाणीव दोन्ही पक्षांना आहे. त्यामुळेच ही युद्धबंदी जाहीर करण्यात आली.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली नाही. आता सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला भाजपाचीही गरज भासू शकते. याच गरजेतून शिवसेनेने भाजपाविरोधात उपसलेली तलवार तूर्त तरी म्यान केली आहे. कल्याण डोंबिवलीत एकहाती सत्ता मिळाली असती तर मात्र शिवसेनेची आजची भाषा वेगळी असती.

Previous Post

आठ नोव्हेंबरला कोकण रेल्वे दुपदरीकरणाचा शुभारंभ

Next Post

टाकाऊपासून टिकाऊ पुनर्निर्मितीचा ‘मदर इंडिया बोर्ड’ हा राष्ट्रीय स्तरावर नोंद घ्यावा असा अभिनव उपक्रम

Next Post
टाकाऊपासून टिकाऊ पुनर्निर्मितीचा ‘मदर इंडिया बोर्ड’ हा राष्ट्रीय स्तरावर नोंद घ्यावा असा अभिनव उपक्रम

टाकाऊपासून टिकाऊ पुनर्निर्मितीचा ‘मदर इंडिया बोर्ड’ हा राष्ट्रीय स्तरावर नोंद घ्यावा असा अभिनव उपक्रम

धावत्या एक्स्प्रेसमधून ७१ लाख लुटणारे पाच जेरबंद

नवी मुंबईत यापुढे शुक्रवारी पाण्याचे ‘शट डाऊन’, पाणी जपून वापरा!

नवी मुंबईत यापुढे शुक्रवारी पाण्याचे ‘शट डाऊन’, पाणी जपून वापरा!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com