• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 31, 2015

रेशनदुकानदारांविरोधात उपोषणाचा ६ दिवस, तरीही पुरवठा अधिकार्‍यांची कारवाई ढिम्म

adminbyadmin
in महाराष्ट्र
0

जळगाव : अमळनेर शहरात तहसिल कार्यालयासमोर मागील सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र प्रशासनाची कोणतीही सूत्र हलत नाहीत. याबाबतीत तहसिलदारांनी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडे अहवाल पाठवला आहे, मात्र जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांची कारवाई ढिम्म असल्याचं सांगण्यात येतंय, यामुळे उपोषणकर्ते नाहक ताटकळले असल्याची चर्चा आहे. उपोषणकर्त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याचं सांगण्यात येतंय.
हे उपोषण दोन रेशनिंग दुकानदारांविरोधात कारवाईच्या मागणीसाठी आहे. आपल्याकडे रेशनिंगमध्ये गैरव्यवहार झाल्याचे पुरावे आहेत, असा दावा श्यामकांत जयवंतराव पाटील यांनी केला आहे, यासाठी मागील ६ दिवसांपासून ते आमरण उपोषणावर आहेत.
याविषयी अमळनेरचे तहसिलदार अमोल निकम यांच्याकडून माहिती घेतली असता, रेशनिंग दुकानदारांची दफ्तरं ही तहसिल कार्यालयात जमा आहेत. मात्र चौकशीसाठी गेलो असतांना हे दोन्ही दुकानदार गैरहजर होते, आम्हाला चौकशीसाठी आणखी वेळ द्यावा अशी मागणी आम्ही उपोषणकर्त्यांकडे करतोय.
मात्र आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा श्यामकांत जयवंतराव पाटील यांनी केला आहे, या पुराव्यांनुसार कारवाई व्हावी, संबंधित दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, गुन्हे दाखल केले, तरच आपण उपोषण सोडू, यावर उपोषणकर्ते ठाम आहेत.
प्रशासनाला आम्ही उपोषणाचं पत्र दिलं होतं, त्याचवेळी त्यांनी चौकशी का केली नाही, त्यांना पुरेसा वेळ होता, तरीही चौकशीसाठी प्रशासनाने दिरंगाई का केली?, असा सवाल उपोषणकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
दहिवद गावामधील रेशनिंग दुकानदारांविरोधात आलेल्या तक्रारींची वेळेत चौकशी झाली असती, तर उपोषणाची वेळ आली नसती असं उपोषणकर्त्यांनी म्हटलं आहे. तहसिलदार अमोल निकम हे आता आले आहेत, त्याआधी सध्याच्या नायब तहसिलदार रूपाली काळे यांच्याकडे तहसिलदारांचा प्रभारी पदभार होता, त्यांनी वेळीच चौकशी केली नाही, ही प्रशासनाची चूक आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, मागील सहा दिवसात एकच दिवस चौकशी करण्यात आली, त्यालाही दुकानदार हजर नव्हते, आम्ही आणखी काही दिवस उपोषण सुरू ठेऊ, वाट पाहू पण कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

Previous Post

विद्यार्थी, नागरिकांच्या उत्साही सहभागाने एकता दौड यशस्वी

Next Post

‘भाजप हरला तर भाजप नेतेच वाजवतील फटाके!’

Next Post

‘भाजप हरला तर भाजप नेतेच वाजवतील फटाके!’

छोटा राजनची तुरुंगातही हाणामारी; दुसर्‍या सेलमध्ये हलवलं

मरेपर्यंत दहशतवादाविरोधात लढणार - छोटा राजन

मोदी जातीयवादी नाहीत - मुफ्ती मोहमद सईद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com