• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 17, 2015

खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नामुळे बससेवेला प्रारंभ!

adminbyadmin
in ठाणे
0
खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नामुळे बससेवेला प्रारंभ!

ठाणे : मीरा भाईंदर हद्दीमधील उत्तन चौक, मनोरी या मार्गावरील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची खंडित झालेली बस सेवा पुन्हा सुरु करण्यात खासदार राजन विचारे यांना यश आले असून बसचे उदघाटन मीरा-भाईंदर शिवसेना सहसंपर्क प्रमुख आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, शहरप्रमुख प्रशांत पालांडे, धनेश पाटील, संदीप पाटील, माजी शहरप्रमुख मनोज मयेकर, महिला शहरप्रमुख स्नेहल कल्सारीया, सुप्रींया घोसाळकर, नगरसेविका जयमाला पाटील, शुभांगी कोटियन, मंदाकिनी गावंड, उपशहरप्रमुख शंकर वीरकर, केसरीनाथ पाटील, विभागप्रमुख अशोक मोरे, मॅकसी नेटोघर, डिक्सन दिनेकर, अलिएस बंड्या, उत्तन प्रवासी संघटनेचे ऑल्वीस फॅरो आणि सर्व कार्यकर्ते तसेच उत्तनवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुर्धा, राई, मोर्वा, डोंगरी, तारोडी, केशवसृष्टी, उत्तन, करईपाडा, पाली, चौक गोराई, कुळव आणि मनोरी ही 25 हजाराहून जास्त लोकसंख्या असलेली गावे भाईदर रेल्वे स्थानकाच्या पश्‍चिमेस 15 ते 20 किमी परिसरात विखुरलेली असून येथे प्रवास करणारे मुख्य प्रवासी म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, कामगार तसेच उत्तन, गोराई, मनोरी बीचला भेट देणारे पर्यटक आणि एस्सल वर्ल्ड आणि जगप्रसिद्ध पॅगोडाला भेट देणारे पर्यटक असतात. पूर्वी या सर्व गावांना राज्य परिवहन महामंडळाची अतिशय नियमित आणि उत्तम प्रकारची सेवा उपलब्ध होती. सर्व प्रवासीवर्ग राज्य परिवहन सेवेच्या सेवेने खुश होता. कालांतराने मीरा-भाईदर महानगरपालिकेची स्थापना झाली आणि पालिकेची परिवहन सेवा सुरु झाल्याने राज्य परिवहन मंडळाची सेवा बंद करण्यात आली. परतू मीरा-भाईंदर महानगरपालिका लोकांना बसेसचा अपुरा पुरवठा असल्याने बस सेवा देण्यास अपयशी ठरली. यासाठी खासदार राजन विचारे यांनी या समस्येची दखल घेवून राज्य परिवहन सेवेला पुन्हा ही महाराष्ट्र राज्य परिवहन बस सेवा सुरु करण्यास भाग पाडले. या बसेस दिवसभरात भाईंदर ते उत्तन चौक अशा 12 फेर्‍या असून पुढे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्यास फेर्‍या वाढविण्यात येईल, असे ठाणे आगार व्यवस्थापक मोरे यांनी कळविले आहे.
खासदार राजन विचारे यांनी मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांबरोबर चर्चा करून त्यांनाही महानगरपालिकेची परिवहन सेवा सुधारण्याची विनंती केली असता त्यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेवून लवकरच परिवहन सेवेत केंद्र शासनाच्या मदतीने नवीन बसेस दाखल करण्याचे आश्‍वासन दिले

Previous Post

जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात मनसेचे ‘थाळीनाद आंदोलन’

Next Post

विक्रमसिंग अधिकारी आणि शुभम वनमाळी यांचा महानगरपालिकेमार्फत सन्मान

Next Post
विक्रमसिंग अधिकारी आणि शुभम वनमाळी यांचा महानगरपालिकेमार्फत सन्मान

विक्रमसिंग अधिकारी आणि शुभम वनमाळी यांचा महानगरपालिकेमार्फत सन्मान

मुंबईतील हॉटेलांची महापालिकेकडून झाडाझडती

नवरात्रौत्सवस्थळी आरोग्य विभागामार्फत मलेरीया / डेंग्यू प्रतिबंधात्मक जनजागृती

नवरात्रौत्सवस्थळी आरोग्य विभागामार्फत मलेरीया / डेंग्यू प्रतिबंधात्मक जनजागृती

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com