• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 4, 2015

कोळसा खाण मंजुरीमुळे ‘ताडोबा’त धोक्यात घंटा

adminbyadmin
in ई - पेपर्स
0
कोळसा खाण मंजुरीमुळे ‘ताडोबा’त धोक्यात घंटा

चंद्रपूर : देशाचं भूषण आणि चंद्रंपूरची शान असलेल्या जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला नवा धोका संभवतो आहे. या व्याघ्र प्रकल्पाला अगदी लागून एका नव्या खुल्या कोळसा खाणीला केंद्रीय वनपर्यावरण मंत्रालय आणि राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. चंद्रपूरमधला हरीत पट्टा तसंच वन्यजीवांसाठी हा धोक्याचा इशारा आहे.
चंद्रपूर शहरापासून सुमारे २२ किमी अंतरावर जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. मात्र, या अंतरात सुमारे अर्धा डझन खुल्या कोळसा खाणी आहेत. इथलं १२१ हेक्टर जंगल बेचिराख करून तिथे दुर्गापूर डीप विस्तार खाणीकरता आता कोळसा उत्खनन केलं जाणार आहे. याबाबत २०१४ साली वनविभागाने पाठविलेल्या प्रस्तावाला केंद्रीय वने-पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे पर्यावरण अभ्यासक आणि वन्यजीवप्रेमी चिंताग्रस्त झाले आहेत.
आधीच इथल्या खाणींमुळे चंद्रपूर जिल्ह्यातल्या वाघांचे सर्वोत्तम भ्रमणमार्ग उध्वस्त झाले आहेत. यात आता दुर्गापूर डीप विस्तारानं या सर्वांवर कडी केली असून, या खाणीनं वाघोबांचं अस्तित्वच संकटात आणलं आहे, असं पर्यावरण अभ्यासक डॉ. योगेश्वर दुधपचारे यांनी म्हटलंय.
विशेष म्हणजे या नव्या खाण क्षेत्रातील जंगलात वाघ, बिबटे, चितळ, अस्वल, सांबर असं विपुल वन्यजीवन आणि वृक्षसंपदा अस्तित्वात आहे. तरीही ही खाण योग्य असून खाणीनं भ्रमणमार्ग तुटणार नाही असा आश्चर्यजनक निष्कर्ष, वन विभागानं नेमलेल्या तज्ज्ञ समितीनं नोंदवला आहे. वनाधिकारी मात्र यावर वनाधिकारी मात्र सारवासारव करताना दिसतायत.
चंद्रपूर जिल्ह्यात ५० कोळसा खाणी आहेत. त्या सर्व जंगलांना-गावाना उध्वस्त करून खोदल्या गेल्या आहेत. मात्र ताडोबाचा भ्रमणमार्ग शाबूत ठेवण्यासाठी वनविभाग आटोकाट प्रयत्न करत असल्याचं आजवरचे चित्रं होतं. मात्र तेही फसवं असल्याचं दुर्गापूर डीपला दिलेल्या परवानगीनं सिध्द झालं आहे.

Previous Post

अन्यथा नवी मुंबईकरांनाही पाणीकपातीचा सामना करावा लागणार!

Next Post

त्यापेक्षा लोकांना मदत करा सनी लिऑन

Next Post
सनी लिऑनमुळे बलात्कार वाढले

त्यापेक्षा लोकांना मदत करा सनी लिऑन

पुुण्यामध्ये आता एकदिवसाआड पाणी पुरवठा

पुुण्यामध्ये आता एकदिवसाआड पाणी पुरवठा

‘प्रकल्पग्रस्तांच्या, ग्रामस्थांच्या गरजेपाटी बांधलेल्या घरांबाबत तातडीने बैठक घ्या’

मुख्यमंत्र्यांच्या हेलिपॅडसाठी दीड लाख लिटर पाणी वाया

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com